‘एमआरओ’चे दर्जेदार संचालन हे आव्हानच

0
9

नागपूर दि.१९ : उपराजधानीत ‘बोर्इंग’ने तयार केलेल्या जागतिक पातळीवरील ‘एमआरओ’चे करारानुसारच ‘एअर इंडिया’ला हस्तांतरण करण्यात आले आहे. या ‘एमआरओ’ मध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. परंतु नागपुरात येण्यासाठी जागतिक पातळीवरील सोडाच परंतु अगदी मुंबईतले लोकदेखील येण्यास तयार नसतात. त्यामुळे याचे दर्जेदार संचालन करणे हे ‘एअर इंडिया’समोर आव्हान राहणार आहे, असे मत ‘बोईंग इंटरनॅशनल’चे उपाध्यक्ष डॉ.दिनेश केसकर यांनी व्यक्त केले. ‘फ्रेन्ड्स इंटरनॅशनल’तर्फे हवाई क्षेत्रातील जागतिक स्थिती आणि बदलते चित्र या विषयावर व्याख्यानाचे सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.केसकर बोलत होते.

जागतिक स्तरावरील हवाई क्षेत्रात चढउतार होत असतात. परंतु एकूण प्रगती लक्षात घेता येत्या २० वर्षात जगभरात ३८ हजार ५० नवीन विमानांची गरज लागणार आहे. यातील १४ हजार ३३० विमानांची सर्वात जास्त मागणी आशिया खंडातून राहणार आहे.