जिल्हाधिकार्यानी केले 16 विद्यार्थी निलंबित

0
17

अकोला,दि.29- सध्या सुरु असलेल्या 12 वी च्या परीक्षेच्या आजच्या पेपरला अकोला जिल्हाधिकारी यांनी विविध परिक्षा केंद्राना भेट दिली.त्यातच बार्शी टाकली तालुक्यातील आळंदा येथील जयबजरंग विद्यालयातील परीक्षा केंद्रावर सरळ ते रुग्णवाहिकेतूनच पोचले.आणि परिक्षा सुरु असलेल्या वर्गात जाऊन तपासणी केली असता विद्यार्थी काॅपी करीत असल्याचे आढळून आले.यावेळी त्यांनी 16 विद्यार्थी निलंबित केले.तसेच शाळा प्रशासनावर सुध्दा ताशेरे ओढत कारवाईचे निर्देश दिले.याप्रकरणी केंद्रप्रमुखासह इतरांचीहीजिल्हाधिकारी यांनी झळती घेतली.