संघटन शक्तीतून जनतेचा विकास साधा- हेमंत पटले

0
21

गोंदिया : केंद्र व राज्य सरकारने शेतकरी, महिला व बेरोजगारांना केंद्रस्थानी ठेवून विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. केंद्र व राज्याचा अर्थसंकल्पातही हे दिसून आले आहे. मात्र, या सर्व योजनांचा लाभ व त्याचे यशस्वी क्रियान्वयन होवून विकास साधण्याकरीता कार्यकत्र्यांनी गावागावात माहिती देवून त्याचे लाभ गरजूंना मिळवून द्यावे. संघटन शक्ती ही फार मोठी असून या ताकदेतून कार्यकत्र्यांनी जनतेचा विकास साधण्याकरीता अहोरात्र काम करण्याचे आवाहन, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केले.
ते २८ मार्च रोजी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी प्रामुख्याने माजी आ. हरीश मोरे, भजनदास वैद्य, खोमेश रहांगडाले, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, महिला मोर्चा प्रदेश सचिव सीता रहांगडाले, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल,जि.प. सभापती देवराम वडगाये, छाया दसरे, जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, भाउराव उके, लायकराम भेंडारकर, रविकांत बोपचे, अशोक इंगळे, नेतराम कटरे, सविता पुराम, दिनेश दादरीवाल,  मनोहर आसवानी, हमीद अलताफ, अमित बुद्घे, सुनिल बंसोड, भावना कदम, हनुवत वट्टी, मदन पटले, धनंजय तुरकर,संजय कुलकर्णी, जयंत शुक्ला, आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना पटले म्हणाले की, ६ एप्रिल रोजी भाजपाच्या स्थापना दिवस गावपातळीवर साजरा करायचा आहे. यात प्रत्येक पंचायत समिती क्षेत्रातील एका गावात व प्रभागात सकाळी ९ वाजता स्थापना दिनाचा कार्यक्रम घेवून पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करायचे आहे. तद्नंतर तालुकास्थळी रक्तदानाचे कार्यक्रम घ्यायचे आहे.  याचप्रमाणे १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती दिनानिमित्त प्रत्येक गावात व वॉर्डात जयंती साजरी करण्यात यावी, असे आवाहन केले. यावेळी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आले.
बैठकीचा समारोप माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केला. यावेळी त्यांनी संघटनेचे महत्व सांगून शासकीय योजनांचा माध्यमातून जनतेचा विकास साधण्याचे आवाहन केले.
सभेचे संचालन जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर यांनी केले. या बैठकीत लक्ष्मण भगत, भाउदास कठाणे, छत्रपाल तुरकर, उमाकांत ढेंगे, सुनिल केलनका, परसराम फुंडे, विजय बिसेन, पप्पू अटरे, सलाम शेख, भरत क्षत्रीय, नंदकुमार बिसेन, मोरेश्वर कटरे, अजित मेश्राम, किशोर हालानी, चेतन वडगाये, अमीन शेख, विनोद किराड, प्रकाश गहाणे, गायत्री चौधरी, उमाकांत हारोडे, मिनू बडगुजर, नितीन कटरे, छोटू बहेकार, अशोक हरिणखेडे, विजय ज्ञानचंदानी, काशीफ जमा कुरैशी, खेमराज लिल्हारे, शंकर मडावी, विनोद भांडारकर, अमृत इंगळे, अजाब रिनाईत, सुरेश पटले, नरेंद्र बाजपेयी, ऋषीकांत साहू, पंकज सोनवाने, महेश चौरे, राजेंद्र बडोले, बाबुलाल पंचभाई आदी उपस्थित होते.