हैदराबादला पावसामुळे सात जण मृत्युमुखी

0
17

वृत्तसंस्था
हैदराबाद – मुसळधार पावसाचा फटका दिल्ली पाठोपाठ हैदराबादला बसला असून, येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. या पावसामुळे आतापर्यंत सात जण मरण पावले असून, त्यातील तीन जण भिंत कोसळल्याने मरण पावले आहेत. त्यातील तीन जण हे रामनथपूर येथील असून उर्वरित चौघे भोलकपूर भागातील आहेत. इमारतीची भिंत कोसळून झालेल्या अपघातामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे मृतांच्या नातेवाइकांना एक लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे.

मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सरकारने कर्मचाऱ्यांना कार्यालयात एक तास उशिराने येण्याची परवानगी दिली आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये 15 वर्षांतील झाला नाही इतक्‍या मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविली आहे.