रेल्वेखाली आल्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू

0
20

अकोला,दि.31 :कॉलेजला जाण्यासाठी घरातून ती निघाली होती. पारसी रेल्वे स्थानकावर पोचताच तिला रेल्वेची धडक बसली.यात रेल्वेखाली येऊन महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना पारस रेल्वे स्थानकावर आज (गुरुवारी) सकाळच्या सुमारास घडली.किरण श्रीकृष्ण साठे असे त्या विद्यार्थिनीचे नाव असून, बाळापूर तालुक्यातील अडोशी येथील रहिवाशी असणारी ही विद्यार्थिनी येथील महात्मा फुले महाविद्यालयात बी.ए.च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती.  पुढील तपास रेल्वे पोलिस करीत आहेत.