लोह्यातील गढीवरचा  रझाकारी लढा.तिघांना  हौतात्म्य..

0
31

नरेश तुप्तेवार
नांदेड,दि.18- मराठवाडा मुक्तिसंग्राम लढयात निजामकालीन गढीवर रक्षाकारांनी शस्‍त्र हल्‍ला केला.यात बळवंतराव दत्‍तात्रेय मक्‍तेदार व पंडितराव किशनराव मक्‍तेदार यांच्‍यावर रझाकारांनी गोळया झाडल्‍या त्‍यातच त्‍यांना वीरगती प्राप्‍त झाली वीरमरण आले. ही घटना जुन १९४७ मधील निजाम राजवठी विरुध्‍द लढताना धारतीर्थी पडलेल्‍या वीरजवानांच्‍या आठवणीची प्रेरणादायी  पण  हुतात्‍मा स्‍मारक आजही उभे नाही.      निजामकालीन कंधारचा सरदार गोपालसिंह गौडवाला यांच्‍या काळात जुन्या लोहयातील बुरुज गढी उभारण्‍यात आली. आजही  या गढीत दहा बुरुजापैकी पाच बुरुज इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.दगडी दरवाजे वर नक्षी काम आणि आतील भाग इतिहासाची साक्ष देते

शतकापूर्वी अमृतराव बळवंतराव मक्‍तेदार व   पंडितराव मक्‍तेदारअसा मोठा परिवार या गढीत राहायचा .दोन गावची मक्‍तेदारी आणि सहा गा वाची वतनदारी  होती.गढीवरील मक्‍तेदार कुटुंब संपूर्ण गावात, सर्वांशी प्रेमाने, सहकार्याने वावरत असत. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढयाला सुरुवात झाली ती जुन १९४८मध्‍ये. दीडशेहुन अधिक रझाकार लोहयात खंडोबाच्‍या माळावर उतरले( सध्याची पाणी पुरवठा टाकी) आल्‍याची खबर कोंडिबा जंगले यांनी गढीवर येऊन दिली. रझाकारांनी गढीवर दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्‍या सुमारास   सशस्‍ञ हल्‍ला गेला.गावात येणा-या वाटा बंद केल्‍या प्रत्‍येक बुरुजावर सशस्‍ञ रझाकार तैनात केले होते. त्या क्षणाच्या  आठवनीने  आजही शरीराचा थरकाप उडतो, असे या घटनेचे प्रत्‍यक्ष साक्षीदार असलेल्‍या(वय ८५ )बापुसाहेब  मालक कुलकर्णी हे  सांगतात. रझाकारांनी गढीवर प्रवेश केला.बळवंतराव    ( चिमणराव ) मक्‍तेदार आणि  पंडितराव मक्‍तेदार यांना मारहाण केली दोघांनाही वाडयात खांबाला बांधले वरवंटा बंदुकीचा दस्‍त्‍याने मारहाण केली.

अर्धमृत अवस्थेत    या दोघांनाही   त्‍यांना सोडुन रझाकरा गेले खरे पण  पुन्‍हा परत आले . दोघांना गोळया झाडुन ठार केले. स्‍वातंञ्यालढयात दोघांनाही वीरमण आले. त्‍यांनतर रझाकारांनी गढीतील सोने, चांदी, नगदी पैसे ,कपडे असा तीन चार लाख रुपयांचा ऐवज पोत्‍यात, बारदाण्‍यात घालुन लुटुन नेला. पंडितराव व बळवंतराव या दोघांच्‍या मृतदेहास पंचनामा तहसीलदार फरीद मिर्झा यांनी केला. रझाकारांचा गोळीबार सुरु असताना वाडयातील सर्व जण कोठयाच्‍या मळयाकडे पळुन गेले.राञ तिथेच काढली, असे बापुसाहेब कुलकर्णी यांनी सांगतात .इतर   लोक गाव सोडुन  पळुन गेले होते.

गढीवर गोळीबार केल्‍यानंतर विश्‍वनाथराव सुर्यवंशी ( माजी नगराध्‍यक्ष कल्‍याण सुर्यवंशी यांचे वडील ) यांच्‍या घराकडे रझाकारानी मोर्चा वळविला त्‍या वेळी माधवराव नळगे-लक्ष्‍मण नळगे यांनी रझाकारांना आव्‍हान दिले. यांच्‍यात एक     तास धुमश्‍चक्री चालली अखेर लक्ष्‍मणराव नळगे यांना वीरमण आले.निझामाच्‍या जुलूमी राजवटीविरुध्‍द संघर्ष करणारी ही भुमी आहे .तीनशे साडे तीनशे  वर्षापुर्वी बांधण्‍यात आलेल्‍या या लोह्यच्या ऐतिहासिक गढीवर रझाकारांशी लढताना दोन वीरांना हौतात्‍म्‍य प्राप्‍त झाले  . गढीची पडझड झाली पण आजही आठवणी ताजा होतात. ना येथे चिरा … नाही येथे पणती अशी आवस्थ आहे.हुतात्माचे  स्‍मारक व्हावे यासाठी भाई केशवराव धोंडगे यांनी सातत्याने पाठपुरावा केला  आज ही करत आहेत .पण निद्रिस्त सरकार जागे झालेच नाही .

. या घटनेचे साक्षीदार बापुसाहेब कुलकर्णी यांच्‍यासह आठवणी लिहुन ठेवणारे संजय मक्‍तेदार यांच्‍यामुळे अनेक ऐतिहासिक घटनांना उजाळा मिळाला.  सेवा निवृत्त राज्याचे कृषि आयुक्‍त कृष्‍णा लव्‍हेकर, डॉ. लक्ष्‍मीकांत लव्‍हेकर, डॉ.श्रीकांत लव्‍हेकर, यांचे पंडितराव मक्‍तेदार आजोबा डॉ. रमेश लव्‍हेकर, नंदकुमार लव्‍हेकर, ही बळवंतरावांची चिरंजीव आता शिरीस लव्‍हेकर, उपअभियंता अतुल लव्हेकर, बापूसाहेब मालक, सतिश लव्‍हेकर, यांचे कुटूंब या गढीवर वास्‍तव्‍याला होते  पण आज सतीश मालक राहतात.शहराच्‍या सौंदर्यात भर टाकणारी ही एैतिहासीक आता पडजडीत उभी आहे. या गढीवर हुतात्‍मा स्‍मारक त्‍यांचे स्‍मारक उभारून त्‍यांचे संरक्षण करायला हवे.सेवानिवृत्त सहकार अधिकारी आणि ज्येष्ठ आप्पाराव चव्हाण हे अनेकदा गावातील प्रसंग हा रणसंग्राम सांगतात .नव्या पिढीला आपल्या गावाच्या इतिहासाची आठवण असायला हवी.लोह्यातील  स्वा. सै विठ्ठलराव पेनुरकर, बाबुराव काळेगोरे,   बळीराम संगेवार, हरी रामा  महाबळे, विश्‍वनाथ महाबळे, माधवराव महाबळे,राम पोटदुखे, नेमीनाथ अन्‍नदाते, बलभिमराव लव्‍हेकर, माधवराव धुतमल, सोपान मास्तर महाबळे, ग्यानोबा धुतमल ,लक्ष्मणराव  नळगे,  यांनी  मराठवाडा मुक्‍ती संग्रामाच्‍या लढ्यात भाग घेतला होता ते आज ह्यात नाहीत पण शासकीय पातळीवर आजच्या दिवशी त्यांच्या नातेवाईकांचा गौरव करण्यात येतो. लोह्याची भूमी हि मुक्ती संग्राम लढ्यातील पावन भूमी ज्या मातीने  मातृभूमीला रझाकारी राजवटीतून मुक्त करण्यासाठी तीन वीर गमावले त्या पावन भूमीत या वीरांचे स्मारक व्हायला पाहिजे ते आजच्या पिढीला प्रेरणा देणारे ठरणार आहे