वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

0
8

वर्धा,दि.20- जिल्ह्यातील आष्टी तालुक्यांतर्गत येणाऱ्या वडाळा वर्धपुर येथे वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार झाल्याची घटना समोर आली आहे. वाघाच्या हल्ल्यात मृत शेतकरी भिकाजी हरले हे शेतातून परत येत असतांना वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यानंतर वाघाने त्यांना फरफटत जंगलात घेऊन गेला. सदर हल्ला चंद्रपूर जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीने केला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज झालेल्या या घटनेमुळे गावामध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभाग पोलिसांचा ताफा घटनेच्या ठिकाणी दाखल झाला असून जंगल परिसरात मृतदेहाची शोध सुरू असल्याची माहिती आहे.