शेतकर्यांसाठी खासदारकी सोडायला तयार-खा.पटोले

0
13

अकोला,दि.25–सरकार अंबानी आणि अदानी यांचीच घरे भरण्याचे काम करीत आहे,महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मी माझी खासदारकी सोडायला तयार असून शेतकरयांच्या प्रत्येक प्रश्नासाठी सरकार ला सळो की पळो करन सोडणार असल्याचे स्पष्ट मत भंडाराचे भाजप खासदार नाना पटोले यांनी अकोल्यात व्यक्त केले.ते रविवारला अकोल्यातील स्थानिक खंडेलवाल भवन येथे आयोजित शेतकरी सवांद मेळाव्यासाठी आले असता बोलत होते.राज्य सरकारने सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीसंदर्भात ठोस पावले उचलावी अन्यथा आपण इतिहासाची पुनरावृत्ती करु शकतो, असे म्हणत खा. पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राजीनाम्याचे संकेत दिले. पटोले यांनी 2009 मध्ये काँग्रेसमध्ये असताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्वपक्षीयांवर हल्लाबोल करत आमदारकीचा राजीनामा दिला होता.कुणाच्या खुर्चीवर असल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडता येत नसतील, तर ती खुर्चीच परत देऊ असे म्हणत पटोले यांनी पुढचे संकेत दिले.