एटापल्ली तालुक्यातील 78 गावांतील नागरिकांचे साखळी उपोषण

0
17

आल्लापल्ली,दि.25 : एटापल्ली तालुक्यातील कसनसूर जारावंडी मुख्य रस्त्यावरुन वाहणारे झुरी नाला व कांदळी नाल्यावरील पुल क्षतिग्रस्त झाल्याने परिवहन महामंडळची बस सेवा व इतर वाहतूक बंद झाल्याने गेली दोन महिन्यांपासून त्या भागातील 78 गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. सदर समस्या व इतर समस्यांची मागणी करत जारावंडी कसनसूर गटाचे जिल्हा परिषद् सदस्य संजय चरडुके, पंचायत समिती सदस्य शालिकराम गेडाम व नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण आज (दि. 25) सोमवारपासून सुरू केले आहे.

झुरी व कांदळी या दोन्ही नाल्यावरील क्षेतिग्रस्त पुलांमुळे तालुक्यातील हालेवारा, कसनसुर, जारावंडी, कमके, कोठी, वाघेझरी, चोखेवाडा, पुन्नुर, सेवारी, झुरी, कोंदावाही, आसावंडी, गडदापल्ली, घोटसुर, मानेवारा, गुडराम, कारका, जवेली, भापडा, दोलन्दा, सिरपुर, सोहगाव, दिंडवी, वडसा कला, इत्यादी 78 गावांच्या नागरिकांना दळनवळनाची पर्यायी व्यवस्था त्वरित करावी तसेच तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करावा, अरोग्याच्या सोयी सक्षम कराव्यात इत्यादी नऊ मागण्या पुढे करून साखळी उपोषण सुरु केले आहे. मागण्या त्वरीत मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, पंचायत समिती सदस्य शालिक गेडाम, तसेच त्याभागातील सरपंच व नागरिकांनी दिला आहे.