‘देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत दादा हेच सरकारचे खरे लाभार्थी’ – उद्धव ठाकरे

0
9

सांगली,दि.26(विशेष प्रतिनिधी : मी लाभार्थीच्या खोट्या जाहिराती करून सरकार जनतेला बधीर करीत आहे. शेतकऱ्याच्या आजही मोठ्या समस्या आहेत. त्यामुळे जनता लाभार्थी झाली नाही. जनतेने मते व सत्ता दिल्याने सरकार लाभार्थी असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हेच खरे सरकारचे लाभार्थी झाल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

सांगली जिल्ह्यातील कार्वे (विटा) येथील शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, आ. अनिल बाबर, खासदार गजानन कीर्तीकर, नितीन बानूगडे-पाटील, जि. प. उपाध्यक्ष सुहास बाबर, अमोल बाबर, संजय विभूते उपस्थित होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात नवीन काही तरी घडेल म्हणून जनतेने सरकार बदलले. पण परिस्थिती बदलली नाही. ही परिस्थिती बदलायची असेल तर सांगली जिल्हा भगवा करा. मी महाराष्ट्र भगवा करतो. मी मुख्यमंत्री होणार नाही, पण एक दिवस मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणारच आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न लोकशाही मार्गाने सुटले नाहीत तर रस्त्यावर उतरणार आहे.