बाबासाहेबांच्या विचाराची समाजाला गरज-खा.प्रफुल पटेल

0
8

गोंदिया दि.१५ : : संविधानाचे रचनाकार डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त शहरातील हजारो बांधवानी आंबेडकर चौकात पोहचून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले. त्यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.येथील आंबेडकर चौकातील मुख्य कार्यक्रमाला खासदार प्रफुल पटेल,आमदार गोपालदास अग्रवाल,नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आमदार राजेंद्र जैन,दिलीप बनसोड,माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी,के.बी.चव्हाण,विनोद अग्रवाल,अशोक गुप्ता,विनोद हरिणखेडे यांच्यासह समितीचे अध्यक्ष धीरज मेश्राम सह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना खासदार प्रफुल पटेल म्हणाले की,डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी जो समाज घडविण्याचा प्रयत्न केला आहे.तो समाज त्याकाळी अत्यंत वाईट व बिकट परिस्थितीमध्ये होता.त्या समाजाला समतेसोबतच समानतेचे अधिकार सविंधानाच्या माध्यमातून दिल्यानेच आज भारताची लोकशाही एकत्र नांदत असून सर्वधर्म समभावाची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे.बाबासाहेबांनी सर्व धर्मजातीचा विचार करुन तयार केलेले सविंधानच देशाचे रक्षण करु शकते.बाबासाहेबांच्या विचाराची खरी गरज देशाला आजच्या परिस्थितीत आहे. परंतु काही लोक त्या सविंधानाला बदलविण्याचा प्रयत्न करीत असून समाजाने त्यासाठी सजग राहण्याची गरज असल्याचे विचार व्यक्त केेले.
शनिवारी (दि.१४) सकाळी रामनगर येथील डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून रॅलीची सुरूवात करण्यात आली. सुर्याटोला, आंबाटोली, सिंगलटोली, रामनगर, आंबेडकर वार्ड, कुंभारेनगर, लक्ष्मीनगर, भीमनगर, श्रीनगर, गौतमनगर, कुंभारटोली होत ही रॅली शहरात पोहचली. त्यानंतर सिंधी कॉलनी, चांदनी चौक, दुर्गा चौक, गोरेलाल चौक, गांधी प्रतिमा, जयस्तंभ होत आंबेडकर प्रतिमेजवळ पोहचली. दुसरी रॅली छोटा गोंदियातून गोविंदपूर, संजयनगर, मोठा गोंदिया, गौतमनगर, सिव्हिल लाईन होत मुख्य रॅलीत सहभागी झाली. रॅलीत भीम गीतांवर तरूण नाचत होते.
दरम्यान सुभाष शाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात नागपूरचे वक्ता पी.एस. चांगोले यांनी डॉ. आंबेडकर यांच्या गुरूसंदर्भात माहिती दिली.बाबासाहेबांना जाती नसलेला समाज अभिप्रेत होता. मनुष्य मनुष्याशी मनुष्याप्रमाणे वागावे असे ते म्हणाले. अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ज्योतिप्रकाश गजभिये, मंचावर अजाब शास्त्री, नगरसेवक पंकज यादव, प्राचार्य सुनील भजे, लोकेश यादव, विरेंद्रकुमार कटरे, सावन डोये, स्मिता सोनवाने उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त समता संग्राम परिषदेकडून सकाळी ८ वाजता तहसील कार्यालय परिसरात डॉ.आंबेडकर प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जातीवादी शासनाचा निषेध केला. दुपारी १२ वाजतापासून समता संग्राम परिषद कार्यालयासमोर भोजनदान सुरू करण्यात आले. रॅलीत सहभागी हजारो नागरिकांनी भोजन केले. सदर कार्यक्रमासाठी संगटनेचे संयोजक प्रा.सतीश बन्सोड, माजी नगराध्यक्ष के.बी. चव्हाण, डॉ.निकोसे, संगटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद मेश्राम, महासचिव राजू राहुलकर, एस.डी. महाजन, रमन सतदेवे, वामन मेश्राम, अ‍ॅड. आनंद बोरकर, अ‍ॅड. गडपायले, जे.एम. खोब्रागडे, मधू खोब्रागडे, किरण फुले, प्रकाश वासनिक, राजाराम चौरे, के.टी. गजभिये, विनोद मेश्राम, सुनीता भालाधरे, अमन फुले, नरेंद्र बोरकर, प्रफुल लांजेवार, डी.आर. वैद्य, हर्षला वैद्य, डॉ.वियंका वैद्य उपस्थित होते.