नंदुरबार, नवापूरात भुकंपाचे सौम्य धक्के

0
7

नंदुरबार, दि़ 21 : जिल्ह्यातील गुजरातच्या सिमावर्ती भागातील अनेक गावांना शनिवारी सायंकाळी भुकंपाचे हलके धक्के जाणवले. भुकंपाचा केंद्र भरूच येथे होते. तेथे 4.6 रिक्टर स्केलची नोंद करण्यात आली. दरम्यान, भुकंपामुळे कुठेही जिवीत किंवा वित्त हाणी झाली नाही. जिल्ह्यात त्याची तीव्रता सौम्य असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी दिली.
शनिवारी सायंकाळी नवापूर, नंदुरबार शहरासह गुजरातच्या सिमावर्ती भागातील अनेक भागात भुकंपाचे धक्के जावणले. नंदुरबार व परिसरात 4 वाजून 52 ते 56 मिनिटांदरम्यान हे धक्के जाणवले. नवापूर तालुक्यातील काळंबा गावातील अविनाश बि:हाडे यांच्या घराच्या भिंतीला या भुकंपामुळे तडा गेल्याचे सांगण्यात आले. भुकंपाच्या धक्याची जाणीव होताच अनेकांनी एकमेकांना विचारणा केली. सोशल मिडियाच्या माध्यमातून माहिती जाणून घेण्याचा अनेकांनी प्रय} केला.
भुकंपाचा केंद्रबिंदू गुजरातमधील भरूच येथे असल्याचे गांधीनगर येथील भुकंप नोंद केंद्रातर्फे सांगण्यात आले. तेथे 4.6 रिक्टर स्केलची नोंद करण्यात आली. नागरिकांनी देखील अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी सांगितले.