भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुक याचिकेवरील सुनावनी राखून ठेवली

0
10

नवी दिल्ली/गोंदिया,दि.२३-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेकरीता पोटनिवडणुक घेण्यात येऊ नये याकरीता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.ती याचिका फेटाळल्यानंतर याचिकाकत्र्याने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली.त्या याचिकेवर आज २३ एप्रिल रोजी सुनावनी अपेक्षित होती.दरम्यान न्यायाधिशांनी ती याचिका पुढच्या सुनावनीपर्यंत राखून ठेवली आहे. याचिका क्रमांक ९९६८-२०१८ ही प्रमोद गुडदे नामक युवकाने भारत निवडणुक आयोगाविरुध्द दाखल केली आहे.त्या याचिकेवर आज सोमवारला मुख्य न्यायाधिश दिपक मिश्रा यांनी नेमलेल्या  न्यायाधिश ए.एम.खानविलकर व न्यायाधिश डी.वाय.चंद्रचुड यांच्या बेंचसमोर सुनावनी होणार होती. सुनावनीकरीता याचिकाकर्ता गुडदेच्यावतीने एड.विकास सिंग,एड.अनघा देसाई,एड.मेहमूद उमर फारुखी,एड.सत्यजित देसाई बाजू मांडणार होते.दरम्यान दुपारी १२ वाजेच्या सुमारास जेव्हा याचिका सुनावनीकरीता आली तेव्हा याचिकाकत्र्याचे मुख्य वकील हे दुसèया एका प्रकरणात व्यस्त राहिल्याने ४ वाजेची वेळ मागण्यात आली.त्यानंतर ४ वाजेच्या सुमारास जेव्हा सुनावनी करण्यात आली तेव्हा मात्र न्यायाधिश महोदयांनी याचिका राखून ठेवत त्यावर नंतर निर्णय देण्याचे ठरविल्याने आज या याचिकेवर निर्णय होऊ शकला नाही.यावरुन याचिकाकत्र्याचे वकील हे कुठल्याही परिस्थितीत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करीत पोटनिवडणुक टाळण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेच दिसून येते.या याचिकेमागे सत्ताधारी राजकीय पक्षाचाच हात असल्याचे मात्र जवळजवळ निश्चित झाले आहे.जे वकील याप्रकरणात सुप्रिम कोर्टात याचिकाकर्त्याची बाजू मांडत आहेत,ते वकिल नामाकिंत असून त्यांची फिसही तेवढीच महत्वाची आहे.