विधान परिषद निवडणुक शिवसेनेचे विप्लव बाजोरिया,भाजपचे पोटे,आंबटकर विजयी

0
12

गोंदिया,दि.24 : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी मतदान झाले. त्यापैकी 5 जागेची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली.त्या निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले असून काँग्रेसला या निवडणुकीत चांगलाच धक्का बसला आहे.गडचिरोली-चंद्रपूर-वर्धा मतदारसंघातून  भाजपचे रामदास आंबटकर विजयी झाले. आंबटकर यांना 550 मते तर काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांना 462  मते मिळाली.  परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांनी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांचा पराभव करत बाजी मारली आहे. विप्लव बाजोरिया हे 256 मते मिळवत विजयी झाले असून, काँग्रेसच्या सुरेश देशमुख यांना 221 मते मिळाली.रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग   –  राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांना निर्णायक आघाडी घेतली आहे. अमरावती विधानपरिषद मतदारसंघातून भाजपाचे प्रविण पोटे विजयी 458  मते घेऊन विजयी झाले. काँग्रेसच्या अनिल मधोगरिया यांना फक्त 17 मते मिळाली असून हा काँग्रेसचा दारुण पराभव म्हणावा लागेल.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतून विधान परिषद सदस्यांसाठी 21 मे रोजी मतदान झाले होते. 24 मे रोजी उस्मानाबाद येथे मतमोजणी नियोजित होती. प्रशासनाने मतमोजणीची तयारीही पूर्ण केली. दरम्यान, निवडणूक आयोगाने ही मतमोजणी तूर्त नियोजित दिवशी करू नये, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गुरुवारी होणारी मतमोजणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्देशात मतमोजणीची पुढील तारीख कळविण्यात आली नाही. त्यामुळे मतमोजणी केव्हा होणार याबाबत अनिश्चितता आहे.मतदानानंतर स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे या जागेवरून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.