धान घोटाळ्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल

0
7

भंडारा,दि.22ः- आघाडी शासनाच्या काळात २0१४ मध्ये जिल्ह्यात धान घोटाळ्याची शासनाने एसआयटीमार्फत चौकशी करून फौजदारी गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणी न्यायालयाने आरोपपत्र स्विकारल्याची माहिती आ. चरण वाघमारे यांनी दिली आहे.
धान घोटाळ्याप्रकरणी सीआयडीने घोटाळ्याची व्याप्ती सांगितली होती. पोलिसांच्या हातात तपास असताना आरोपींना अटकपूर्व जामिन मिळण्यास तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी आरोपींना अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोपामुळे शासनाने सीआयडीकडे प्रकरण सोपविले होते. मागील ३ वर्षांपासून राज्य गुन्हे अन्वेषण विभाग तपास करीत असताना शासनाने आरोपपत्रदाखल करण्याची परवानगी दिली.
जवळपास ६ हजार पानांच्या आरोपपत्रावर आरोपीच्या वकिलांनी न्यायालयासमोर चर्चा करून आरोप मान्य नसल्याने प्रकरण न्यायालयाच्या चालविण्यात येऊ नये, असा युक्तीवाद करण्याचा प्रयत्न केला. अखेर गुरूवारी (दि.१९) न्यायालयाने आरोपपत्र स्विकारले असल्याची माहिती आ. चरण वाघमारे यांनी दिली.