आरक्षण संपवण्याचा डाव; छगन भुजबळ यांचा सरकारवर हल्लाबोल

0
13

मुंबई,दि.22: भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा आरक्षण संपवणे हा अजेंडा असून राज्य सरकारने त्यासाठीचे निर्णय घेतले आहेत. असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते छगन  भुजबळ यांनी आज केला. मात्र सरकारचा हा डाव यशस्वी होऊ देऊ नका असे आवाहन करत मोदी सरकारच्या धोरणावर भुजबळ यांनी जोरदार टीका केली. मुंबई राष्ट्रवादी कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरात ते बोलत होते. लोकांच्या हितासाठी ताठ मानेनं उभे राहा असा सल्ला देताना ते म्हणाले की, आंदोलन करायला घाबरू नका. अटक होईल म्हणून मागे हटू नका. मला स्वत:ला अनेक आंदोलनांमध्ये अटक झाली पण मी डगमगलो नाही. लोकांसाठी झोकून द्या. असे भुजबळ यांनी मार्गदर्शन केले. दरवेळी कायदा हातात घेवूनच आंदोलनं केले पाहिजे असे नाही. मात्र ‘घी सिधी उँगलीसे नहीं निकले तो उँगली टेढी करनी चाहिये’ हे सूत्र लक्षात ठेवा असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.