चंद्रकांतदादांना निवडणुकांना सामोरे जाणे अजून शिकायचे आहे; शरद पवार

0
11

कोल्हापूर,दि.28- वादग्रस्त विधाने करून नेहमी चर्चेत राहणारे चंद्रकांत पाटील हे अपघाताने मंत्री झाले आहेत. मी 14 वेळा निवडणुका लढवल्या. 7 वेळा थेट जनतेतून निवडणुकीला सामोरा गेलो. चंद्रकांत पाटील यांना निवडणुकाना कसे सामोरे जायचे हे अजून शिकायचे आहे, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत लगावला.वादग्रस्त वक्तव्य करणे, हे मंत्री पाटील यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांची वक्तव्ये फारशी गांभीर्याने घेण्यासारखी नसतात. हीच बाब मुखमंत्र्यांबाबत लागू होते. मात्र येणाऱ्या काळात निवडणूक असून त्याचा आम्हाला चांगलाच फायदा होईल, असा विश्वासही शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.राज्यात मराठा समाजाचा उद्रेक सुरू आहे. महाराष्ट्र अस्वस्थ झाला आहे. या उद्रेकाच्या आगीत तेल ओतण्याचे काम मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य करत असल्याची टीकाही त्यांनी केली.