नांदेडमध्ये ओढ्याच्या पुराने घेतला चौघांचा बळी

0
15

नांदेड,दि.21: गेल्या चार दिवसांपासून  सुरू असलेल्या पावसाने परिसरातील नदी-नाल्याना पूर आले आहे. सोमवारी झालेल्या पावसाने अनेक गावांचा संपर्क तुटला असून ओढ्याला आलेल्या पुराने दोन वेगवेगळ्या घटनेत चौघांचा बळी घेतला तर वाहून गेलेले अन्य दोघांचा शोध घेतला जात आहे.सोमवारी रात्री वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये  जिल्ह्यात ४ जण वाहून गेले आहे. मावंद्याच्या जेवणासाठी बहिणीच्या घरी आलेला भाऊ, भाऊजयी आणि त्यांची मुलगी यांचा मृतांमध्ये समावेश आहे. बहिनीकडून जेवण करून परतताना नायगाव तालुक्यातील मांजरम-कोलंबी दरम्यान असलेल्या पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची जिप ओढ्यात गेली.  गाडीतून बाहेर पडण्याची संधी न मिळाल्याने त्यांचा गाडीतच मृ़त्यू झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.