पक्षाची ध्येयधोरणे गावागावात पोहोचवा : चंद्रिकापुरे

0
15

अर्जुनी मोरगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदिवासी दिन दलित व गोरगरिबांची सेवा करणारा पक्ष आहे. पक्षाची प्रणाली व ध्येय धोरणे गावागावात पोहोचविण्याचे काम पक्ष कार्यकर्त्यांनी करावे तथा गाव तिथे राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करावे. कारण एकीचे बळ असल्याशिवाय ध्येय साध्य करणे कठीण आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी केले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव व केशोरी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात बूथ कमिटी स्थापन व एनसीपी स्थापनापन प्रणाली संबंधित कार्यक्रमात ते बोलत होते. महागाव जि.प. क्षेत्रांतर्गत बूथ कमिटी व कार्यकर्ता आढावा बैठक स्व. पंढरीबापू देशमुख विद्यालय महागाव येथे घेण्यात आली. सभेला राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी मनोहरराव चंद्रिकापुरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष जि.प. सदस्य किशोर तरोणे, प्रा. यशवंत परशुरामकर, जि.प. सदस्य भाष्कर आत्राम, पं.स. सदस्य सुधीर साधवानी, त्र्यंबक झोळे, निप्पल बरैय्या, अनिल लाडे, गुरुदेव चौधरी, संजय कांबळे, नामदेव लांजेवार, बाबुराव सुकारे, साफीन पठान, हेमराज डोंगरे, नासीन पठान, ज्ञानदेव गायकवाड, प्रभू वानखेडे, रामलाल लांजेवार, प्रशांत सांगोळे, भोजराज टेंभुर्णे, दिनेश गायकवाड, विक्रम पालीवाल, राशीद पठान प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहरराव चंद्रिकापुरे, किशोर तरोणे व लोकपाल गहाणे यांच्या नेतृत्वात अर्जुनी मोरगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत होत असून आता गावागावात बूथ कमिटीच्या स्थापना करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. सोबतच एनसीपी, कनेक्ट व्यवस्थापन प्रणालीचे कामही जोरात सुरू आहे. राष्ट्रवादीच्या उपक्रमाला जनताही मोठ्या प्रमाणात दाद देत असल्याचे दिसून येते. .