कुलगाम सेक्टरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

0
19

श्रीनगर ,दि.१५(वृत्तसंस्था)- सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणा?्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. शनिवारी (१५ सप्टेंबर) सकाळी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम सेक्टरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. काजीगुंड भागात एक दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने सध्या परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. चकमकीनंतर बारामुल्ला-काजीगुंड भागातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली असून जवानांकडून शोधकार्य सुरू आहे. कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (१४ सप्टेंबर) रात्री उशिरा ही चकमक सुरू झाली.