महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केंद्र सरकारला पत्रसुध्दा लिहिले आहे. तरीही केंद्र सरकारने फुले दाम्पत्याला भारतरत्न देण्याबाबत सकारात्मकता दाखवली नाही.आता विदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी जोर धरत आहे. राष्ट्रीय जनसुराज्य पक्षाने आपल्या विभागीय मेळाव्यात नुकताच याबाबत एक ठरावही पारित केला आहे. जर केंद्र सकरारने येत्या २ महिन्यात याबाबत निर्णय घेतला नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जनसुराज्य पक्षातर्फे देण्यात आला आहे.