भाजप सरकारची पीक विमा योजना अपयशी-आ.अग्रवाल

0
12

गोंदिया,दि.18 : भाजप सरकारच्या राज्यात प्रत्येकालाच ठगल्यासारखे वाटत आहे. शेतकरी कर्जमाफीची योजना पुढे करून त्यावर अनेक शर्ती लावण्यात आल्या. परिणामी कित्येक शेतकरी त्यातून बाहेर करण्यात आले. तर कित्येक आजही कर्जमाफीच्या पतीक्षेत आहेत. तोच प्रकार पीक विमा योजनेचा आहे. कोट्यवधी रूपये पीक विम्याच्या नावावर जमा केले. मात्र दुष्काळानंतरही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. भाजप सरकारची पीक विमा योजना फेल ठरल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम बिरसोला येथील ६० रूपयांच्या निधीतून निर्मित अंतर्गत सिमेंट रस्त्याचे लोकार्पण व ३ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर बाजार मैदानातील गट्टू लावण्याच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य लोकचंद दंदरे होते. त्यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे गोंदिया विधानसभा क्षेत्रात विकास कामांना गती मिळाली आहे. यामुळेच जेथे विकास कामांचा विषय निघतो तेथे आमदार अग्रवाल यांचे नाव पुढे येत असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला तहसीलदार सारंग, चमन बिसेन, ओमप्रकाश भक्तवर्ती, बबीता देवाधारी, आनंद तुरकर, आशिष चव्हाण, देवेंद्र मानकर, कत्तेलाल मातरे, निर्वता पाचे, झनकसिंग तुरकर, दिलीप तुरकर, कपूरचंद पाचे, रामभगत पाचे, कांती पाचे, डॉ. देवा जमरे, कविता दंदरे, सरोजनी दंदरे, डिलेश्वरी पाचे, प्रिती तुरकर, सुरवन पाचे, नेतलाल मात्रे, केशव नागफासे, संजय देवाधारी, बालाराम खैरवार, रूखी पाचे, माणिकचंद तुरकर, सोमेश्वरी पाचे, शामराव तुरकर, कैलाश देवाधारी, मोहपत खरे, अमृत तुरकर, तपेश सोनवाने यांच्यासह कॉँग्रेस कार्यकर्ता व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.