९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी देवेंद्र चौधरी यांच्या पोवारी कवितेची निवड

0
15

तिरोडा,दि२६ येथील सुप्रसिद्ध कवी व गझलकार देवेंद्र चौधरी यांची पोवारी कविता ” मनको घाव” या कवितेची निवड ‘यवतमाळ’ येथे दिनांक ११ ते १३ जानेवारी २०१९ रोजी आयोजित “९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन” चे कविकट्टा साठी निवड झाली आहे.मागील वर्षी देखील त्यांच्या ‘पणन” या कवितेची बडोदे (गुजरात) येथे आयोजित ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निवड झाली होती. तिथे त्यांचा विशेष सन्मान होवून त्यांना गौरविण्यात आले होते.
विशेष म्हणजे की, पोवारी बोलीभाषेतील त्यांची “मनको घाव” या कवितेची निवड होणे पोवार समाजासाठी गौरवाची बाब आहे. आजपावेतो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एखाद्या पोवारी कवितेची निवड होणे ही प्रथम च वेळ आहे. कवी देवेंद्र चौधरी हे आपली कविता “मनको घाव” ही दिनांक १२ जानेवारी २०१९ रोजी सादर करण्यात येत आहे. पोवार समाज, तिरोडा परिसर व त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.