मग्रारोहयो कंत्राटी कर्मचाèयांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा

0
19

गोंदिया,दि.०८ः-महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना(मग्रारोहयो)अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाèयांच्या बदल्या एका विशिष्ट कालावधीनंतर नियुक्तीच्या ठिकाणापासून बदलविण्याबाबतचे निर्देश महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे उपायुक्त नायक यांनी एका पत्राद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व कार्यक्रम समन्वयकास दिले आहेत.आयुक्त नायक यांनी ७ मार्च रोजी या संदर्भातील पत्र पाठवून त्या पत्रात ३ ते ५ वर्ष एकाच कार्यालयात झाली असतील अशा कर्मचाèयाला दुसèया तालुक्यात नियुक्ती दिल्यास शासनाच्या कामात गती येईल व खोटया तक्रारीवंर आळा बसेल असे म्हटले आहे.यापुर्वी शासनाने दिलेले १० एप्रिल २०१७च्या पत्रानुसार जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावरुन सबंधित यंत्रणेला सुचना द्यावेत असेही त्या पत्रात म्हटले आहे.