मुंबई,दि.22 :– राज्यातील लोकसभेच्या 48 जागासांठी आघाडी व युतीच्यावतीने भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.त्यात आज(दि.21) शिवसेनेकडूनही 21 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.काही मतदार संघ सोडले तर आता सर्वच पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहिर केले आहेत. आता खर्या अर्थाने राजकीय धुळवडीला सुरवात झाली आहे.तर उर्वरित सहकारी मित्र पक्षासांठी जागा सोडल्या आहेत.बहुतांश विद्ममान खासदारांना शिवसेनेने पुन्हा रिंगणात उतरवले आहे.त्यापैकी यवतमाळ -वाशिमच्या रिंगणात मात्र रंगत येण्याची शक्यता आहे.अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उदघाटक राहिलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या पत्नीला प्रहारने रिंगणात उतरवले आहे.जेव्हा की शिवसेनाप्रमुखांनी त्यावेळी प्रत्येक गोष्टीत सहकार्याचे आश्वासन दिले होते.
उमेदवारांची नावे आणि मतदार संघाचे नाव पुढील प्रमाणे :
दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
उत्तर पश्चिम मुंबई – गजानन किर्तीकर
ठाणे – राजन विचारे
कल्याण – श्रीकांत शिंदे
रायगड – अनंत गिते
कोल्हापूर – संजय मंडलिक
हातकणंगले – धैर्यशिल माने
नाशिक – हेमंत गोडसे
शिर्डी – सदाशिव लोखंडे
शिरुर – शिवाजीराव आढळराव-पाटील
औरंगाबाद – चंद्रकांत खैरे
यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
बुलढाणा – प्रतापराव जाधव
रामटेक – कृपाल तुमाणे
अमरावती- आनंदराव अडसूळ
परभणी- संजय जाधव
मावळ – श्रीरंग बारणे
उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर
हिंगोली – हेमंत पाटील