प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम 2019 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

0
65

मुंबई-  शासनाने खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक 24 जुलै, 2019 अशी आहे.

राज्यात खरीप हंगाम 2019 मध्ये सदरची योजना खाली नमुद केलेल्या विमा कंपनीकडून संबंधीत जिल्हा समुह क्षेत्रामध्ये राबविण्यात येईल.
जिल्हा समुह क्र. – समाविष्ट जिल्हे – विमा कंपनीचे नाव व पत्ता
1 – उस्मानाबाद, वर्धा, भंडारा, गोदिया, चंद्रपुर -एग्रीकल्चर इंश्योरंस कम्पनी ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई क्षेत्रीय कार्यालय: स्टॉक एक्सचेंज टॉवर्स, 20 वी मंजिल, पुर्व खंड, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई 400023
फोन : 022-61710901, 902,903 , टेली फॅक्स : 61710915
टोल फ्री क्र 1800 116515

2- ठाणे, रायगड, नाशिक, नांदेड, गडचिरोली 
3 -पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, बीड 
4- रत्नागीरी, नंदुरबार, जळगाव, कोल्हापुर, लातुर 
5 -जालना, हिगोली, नागपुर – बजाज अलियान्झ जनरल इंशुरंस कं. लि.कॉमरझोन, 1 ला मजला, टॉवर 1 , समर्थ अशोक मार्ग, येरवडा पुणे -411006
दुरध्वनी क्र 02066240137, टोल फ्री क्र 18002095959

6- अहमदनगर, परभणी, वाशिम -एग्रीकल्चर इंश्योरंस कम्पनी ऑफ इंडिया लिमिटेडमुंबई क्षेत्रीय कार्यालय: स्टॉक एक्सचेंज टॉवर्स, 20 वी मंजिल, पुर्व खंड, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई 400023
फोन : 022-61710901,, 902,903 , टेली फॅक्स : 61710915
टोल फ्री क्र 1800 116515

7 -औरंगाबाद, बुलडाणा, अमरावती 
8 -धुळे, सोलापुर, सांगली,अकोला, यवतमाळ

योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व यआपले सरकार सेवा केंद्रय (डिजीटल सेवा केंद्र) यांचे मार्फत विमा अर्ज स्विकारण्यात येत आहेत. बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यामुळे अंतिम मुदतीच्या अगोदर ऑनलाईन अर्ज भरता न आल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतक-यांना सहभागी होता येणार नाही. तरी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळणेस्तव विहित मुदतीपुर्वी नजिकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा. 
योजनेतील सहभागासाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँक, यआपले सरकार सेवा केंद्रय (डिजीटल सेवा केंद्र) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन मा. ना. चंद्रकांतदादा पाटील, मंत्री, कृषि व पणन यांनी केले आहे.