ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज – बालू चुन्ने

0
36

लाखांदूर,दि.19ः राज्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये नगरपंचायत,नगरपालिकेसारखेच स्वीकृत सदस्याची निवड करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे लाखांदूर तालुकाध्यक्ष बालू चुन्ने यांनी केली आहे. ग्रामपंचायत अधिनियम कायदा (१९५८) कलम ५ नुसार ग्रामपंचायतमध्ये सदस्य निवड होते. तसेच सरपंच, उपसरपंच निवड केली जाते. वार्ड रचना व आरक्षण यामुळे चांगल्या सामजिक राजकीय काम करु इच्छुक लोकांना या पध्दतीमुळे निवडणूक अथवा ही संधी मिळत नाही. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये चांगल्या लोकांना समाविष्ठ करता येत नाही. ग्राम पंचायत निवडणुका अतीसंवेदनशील होतात. परंतु, स्वीकृत सदस्य निवड करण्याचा अधिकार दिल्यास काही समाजसेवक, सुशिक्षित राजकारणाची आवड असणार्‍या पण निवडणुका न लढवता न्याय देऊ शकतो. हे करण्यासाठी महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९५६ च्या काही तरतूदी नुसार १0 नगर सेवका मागे १ स्वीकृत नगर सेवक निवडता येते. याप्रमाणे ग्रामपंचायत अधिनियम कायद्यामध्ये बदल करुन गावची लोकसंख्या किंवा ग्रामपंचायत सदस्य संख्या नुसार ग्रामपंचायत स्वीकृत सदस्य निवड करण्याचा अधिकार देण्यात यावा. यामुळे गावविकासाची तळमळ असणारे गावातीलच होतकरू व्यक्तिमत्त्व असणार्‍या नागरिकांना या संधीचा फायदा घेऊन गावविकासासाठी काहीतरी नविन करून दाखविण्याची संधी मिळेल. गावसुद्धा विकासाच्या वाटेकडे वाटचाल करू शकेल हा एकच उद्देश डोळयासमोर ठेऊन लाखांदूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालू चून्ने यांनी ही मागणी रेटून धरली आहे.