साकोली,दि.२३-तालुक्यातील शेतकèयांनी सत्ताधारी आमदार खासदारासंह सर्वच लोकप्रतिqनधीनी दिलेल्या खोट्या आश्वासनाचा निषेध नोंदवित शेतकरी संटकमोचन समितीच्या नेतृत्वात १६ तासाचे भारनियमन बंद करण्याच्या मागणीला घेऊन आज २३ फेबुवारीपासून विज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलनाला सुरवात केली आहे.जोपर्यंत मागणी पुर्ण होत नाही,तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार समितीच्या सदस्यांनी घेतला आहे.या आंदोलनाचे नेतृत्व डॉ.अजयराव तुमसरे,राम महाजन आदि करीत आहेत.