पिकविमा योजनेचा लाभ शेतकºयांना नव्हे, कंपन्यांना-मनोहरराव चंद्रिकापुरे

0
18
अर्जुनी मोरगाव तालुक्यात राष्ट्रवादीची शेतकरी दिंडी
अर्जुनी मोरगाव,दि.24 : गोंदिया जिल्ह्यात या वर्षी खरीप पिकाची धानपिक परिस्थिती अत्यंत वाइट आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव व नवेगावबांध परिसरात गारपीट व चक्रीवादळाने धानपिकाचे प्रचंड नुकसान झाले आणि उर्वरीत पीक कडीकरपा व तुडतुडा रोगाने नेस्तनाबूत झाले. तरी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत झाला नाही. राज्य शासनाने गोंदिया, तिरोडा व गोरेगाव या तीनच तालुक्याचा मध्यम स्वरुपाच्या दुष्काळात समावेश केला आहे. यावर्षी हमीभाव खरेदी केंद्रावरील धानाची आवक घटली. धान उत्पादनात जिल्ह्यात ७ लाख क्विंटलने घट झाली. दुष्काळ घोषीत करण्यास शासन सकारात्मक नाही. पंतप्रधान पीक योजनाचे निकष शेतकºयांना डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे शासनाची पिकविमा योजनाही फसवी आहे. पिकविमा योजनेचा लाभ शेतकºयांना नाही तर संबंधीत कंपन्यांसाठी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी तथा किसान सभा अध्यक्ष मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी केला आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मनोहरराव चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या शेतकरी सन्मान दिंडी व जनजागृती अभियान अंतर्गत २२, २३ फेब्रुवारीला महागाव येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, प्राचार्य यशवंत परशुरामकर, पं.स. सदस्य जनार्धन काळसर्पे, सुधीर साधवानी, युवा अध्यक्ष योगेश नाकाडे, डॉ. देशमुख, हुमणे, सोनटक्के प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रवादीची शेतकरी सन्मान दिंडी व जनजागृती अभियान यात्रा २२, २३ फेब्रुवारी रोजी महागाव जि.प. अंतर्गत बुटाई नं.१, बुटाई नं.२, आदिवासीटोली, बोरी, सावरी, मांडोखाल, कोरंभीटोला, अरुणनगर, गौरनगर, कोरंभी, जानवा या गावातून भ्रमण करून महागाव येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी शेतकºयांबरोबर पीक परिस्थिती, दुष्काळ, पिकविमा योजना, वाढत असलेली महागाई व बेरोजगारीबाबद चर्चा करून सध्याचे शासन कसे निष्कीय आहे, हे समजावून सांगितले.