ओबीसी महासंघाच्या महिला सदस्यांनी घेतली बांते कुटुबियांची सांत्वना भेट

0
8

नागपूर,दि.31ः-जिल्ह्यातील मारोडी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंब असलेल्या तुळशीराम बांते यांनी सरकारच्या धोरणांना व महागाईला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याने बांते कुटुंबियावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.येत्या 20 एप्रिलला घरी मुलीचे लग्न असताना आपण त्या लग्न कसे करायचे या विवंचनेत बांते यांनी आपली जिवनयात्रा संपविली.या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय ओबीसी महिला संघाच्या अध्यक्षा सुषमा भड ,जिल्हाध्यक्ष अवंतिक लेकुरवाळे,कल्पना मानकर,शहराध्यक्ष निर्मला मानमोडे यांच्यासह इतर महिला सदस्यांनी मारोडी हे गाव गाठत बांते कुटुबिंयाची घरी जाऊन सांत्वना दिली.राष्ट्रीय ओबीसी महिला संघाच्यावतीने तुळशीराम बांते यांना यावेळी श्रध्दाजंली वाहण्यात आली.तसेच सरकारने महागाई,बेरोजगारीसह डीबीटीच्या नावावर व्यापारी व धनाढ्यांचे पोट भरुन सर्वसामान्य शेतकर्याला मात्र आत्महत्येस प्रवृत्त करीत असल्याची टिका केली.बांते यांच्याकुटुंबियांनी तत्काळ सरकारने मदत द्यावी यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही सांगितले.याप्रसंगी पदाधिकारी नंदा देशमुख, वंदना वनकर, सुनीता जिचकार, आरती बाळसराफ, प्रेमिला मानमोडे, उर्मिला मानमोडे इ. उपस्थित होत्या.