सिमावर्ती प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी गुरुवारी शिष्टमंडाळासोबत करणार चर्चा

0
12
बिलोली(सय्यद रियाज ),दि.24ः- बिलोली विश्राम गृहात सिमावर्ती भागाचे प्रश्न याविषयी बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणिस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विकासाचा आराखडा सादर करण्याचे ठरले. दरम्यान जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी या विषयी गुरुवारी शिष्ट मंडळास चर्चेसाठी पाचारण केले आहे. या चर्चेसाठी अकरा व्यक्तीचे शिष्टमंडळ भेटणार आहे.
 या बैठकीत मागील चार बैठकाच्या आढावा घेण्यात आला. याचबरोबर मुख्यमंञ्याकडे सादर करावयाचा विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. सर्वसंमतिने सामुयिक विकासाचे सर्व समावेशक निवेदन तयार करण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी गुरुवार दि.28 जुन 2018 रोजी विकास विषयक निवेदनाच्या चर्चेसाठी पाचारण केले आहे.प्रारंभी निवेदन चर्चा गरज पडली तरच आंदोलन करावे अशी भुमिका सर्व सदस्यांनी मांडले.शेतकऱ्यांच्या पेरणीचे दिवस असल्याने यात जनतेच्या प्रश्नांसाठी शेतकऱ्यांना गुंतवल्या जावू नये.अशी भुमिका काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सदर याबैठकीत ज्येष्ठ पञकार तथा प्रश्न सिमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक श्री गोविंद मुंडकर,गंगाधरराव प्रचंड,माजी नगराध्यक्ष जावेद मजीदसेठ, राजु पाटील शिंपाळकर, राजेंद्र पा.जामनोर कारलेकर, सिध्दनोड व्यंकटरराव, माधव हळदेकर, देविदास कोंडलाडे,नागोराव लोलापोड, संतोष मेहरकर,गंगाधरराव गटूवार, दमय्यावार श्रीनिवास,गंगाधरराव कोंडावार,नरसिंग कलमुर्गे,नरसिंमलु कोटलावार,नरसिंमलु कोंडावार, बालाजी महाजन आदीनी सहभाग घेऊन सुचना मांडल्या. तब्बल चार तास चाललेल्या बैठकीत विविध विकास विषयक घडामोडीवर चर्चा करून पुढील कार्याचे रुपरेषा ठरविण्यात आली.