संविधानाच्या प्रती जाळण्यामागे भाजपाचे प्लॉनिंग;पत्रपरिषदेत जयंत पाटील यांचा आरोप

0
10
गोंदिया,दि.19ः -देशात भाजपाच्या सोयीचे राजकारण सुरू आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर संविधानाची प्रत जाळली जाते, आंबेडकरांविषयी अवमानजनक विधान केले जाते. मात्र, त्या समाजकंटकांवर कोणतीही कारवाई होत नाही.  यावरून या देशाचे राजकारण कोणाच्या हिताचे आहे, संविधान जाळण्यामागे भाजपाचे हात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी केले. ते नमाद महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित  पत्रपरिषदेत बोलत होते.
७० वर्षांत रुपयाचे अवमूल्यन झाले नाही. तेवढे रुपयाचे अवमूल्यन मोदी सरकारच्या काळात झाले आहे. यावरूनच देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात येते. आजपर्यंत रुपयाचे अवमूल्यन कधीच एवढया निच्चांकी पातळीवर आले नाही. जीएसटी, नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली असून, नोकर्यांची स्थिती गंभीर आहे. गेल्या चार वर्षात देशातील जनतेला दिलेले कोणतेही आश्वासन मोदी सरकारने पूर्ण केले नाही. शेतकNयांना उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव देण्याची ग्वाही या सरकारने दिली होती. मात्र, अद्याप ते सरकारला जमले नाही असे सांगत देशात शेतकNयांची स्थिती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करीत आहे. मात्र, दिवंगत पंतप्रधान वाजपेयी यांनी सत्तेचा मोह कधीच बाळगला नाही. वाजपेयी यांचे नेतृत्व सर्वसमावेशक होते असे सांगत त्यांनी वाजपेयी यांची भाजपाला उणीव जाणवेल असे ते म्हणाले. राज्यात आमची सत्ता  असताना भाजपाने ३२०० रूपये समर्थन मुल्य देण्याची मागणी केली होती. मात्र, जेव्हा भाजपाची सत्ता वेंâद्रात व राज्यात असतानादेखील धानाला अद्यापर्यंत समर्थन मुल्य मिळू शकले नाही. ऐवढेच नाही तर आघाडी सरकारच्या काळात आम्ही शेतकNयांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली होती. परंतु भाजपा सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसने संघर्ष यात्रा काढल्यानंतर दबावात येवून फसवी कर्जमाफी जाहीर करूनही अद्यापसुद्धा शेतकरी कर्जमाफीपासून वंचित  आहेत. भाजपा सरकारच्या कार्यकाळात देशात अराजकतेचे वातावरण निर्माण झाले असून येत्य २०१९ निवडणुकीत जनताच भाजपाला धडा शिकवेल असे त्यांनी सांगितले.