जनता दरबारात खा.नेतेंनी एैकल्या समस्या

0
9

आमगाव,दि.30ः- गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते यांनी येथील जनता तक्रार दरबारात उपस्थित नागरिकांच्या तक्रारी व समस्या जाणून घेऊन सदर समस्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना सर्व अधिकारी व विभाग प्रमुखांना दिल्या.समस्यांचे निराकरण दिलेल्या वेळेत न केल्यास खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय पुराम,माजी आमदार केशवराव मानकर, माजी आमदार भैरसिंग नागपुरे, जिल्हा संघटन मंत्री विरेंद्र अंजनकर, गडचिरोलीचे लोकसभा विस्तारक तथा भाजप चे प्रदेश कार्य. सदस्य बाबुरावजी कोहळे, तालुकाध्यक्ष ऍड. येसूलाल उपराडे, राकेश शेंडे, राजू पटले, जि प सदस्य शोभेलाल कटरे, शहर अध्यक्ष घनश्याम अग्रवाल तथा जि प सदस्य, प.स.सभापती, पस सदस्य, नगर सेवक उपस्थित होते.या तक्रार दरबारात तालुक्यातील एक हजाराच्या वर शेतकरी, मजूर वर्ग व नागरिक उपस्थित होते .बैठकीत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.