गोसलियाअध्यापक विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात

0
76

सांगली,दि.20ः-अंबाबाई तालीम संस्थेच्या शेठ रतीलाल विठ्ठलदास गोसलिया अध्यापक विद्यालय मिरज येथील माजी विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एकञित येत आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत मोठ्या उत्साहात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा साजरा केला.या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे उदघाटन ज्येष्ठ विचारवंत इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते पार पडले.यावेळी राज्याचे माजी सहाय्यक शिक्षण संचालक संपतराव गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे,महेश चोथे, एन के फडणीस, पी जे खोत,सतीश आपटे, किशोर कलगुटगी,पराग इनामदार ,सुमंत कुलकर्णीउपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य गौतम शिंगे होते.यावेळी संपूर्ण बॅचच्या वतीने या बॅचला शिकवणाऱ्या सर्व गुरूवर्याचा सत्कार करण्यात आला.

स्वातंत्र्य पूर्व काळातील या शिक्षण संस्थेच्या इतिहासात प्रथमच माजी विद्यार्थ्यांनी असा कार्यक्रम घडवून आणला होता.या मेळाव्याचे अनेकांनी कौतुक केले. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने स्मृतिचिन्ह व त्याचवेळी प्रकाशित करण्यात आलेल्या स्मृतिगंध ही स्मरणिका देऊन देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.माजी विद्यार्त्यांपैकी काही विध्यार्थी राज्य प्रशासनात उच्च पदावर पोहचले आहेत. सत्कार सोहळा सुरू असताना अनेक शालेय जीवनातील वेगवेगळ्या आठवणीनाही उजाळा दिला जात होता. सध्या माणसे माणसापासून दुरावत चालली आहेत. या धकाधकीच्या आयुष्यात कोणाला भेटायला वेळ नाही. पूर्वीचा काळ व आताचा काळ यात मोठा फरक आहे.
स्नेह मेळाव्यातील मित्रांनी सामाजिक, राजकीय, व्यवसायक, नोकरीत जे यश संपादन केले त्याबाबत मनोगत व्यक्‍त केले. आजपर्यंतच्या आयुष्याचा आढावा घेताना आपल्या जीवनातील चढ-उतार अनेकांनी नमूद केले. तसेच अनेकांनी आठवणींना उजाळा दिला.या आठवणीने शिक्षक ही भारावून गेले होते.द्वितीय सत्रात माजी विद्यार्थ्यांनी बहारदार असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले. यावेळी सकाळ सत्रात प्रसिद्ध विचारवंत इंद्रजित देशमुख यांचे शिक्षण, शाळा व शिक्षक या विषयावर सखोल मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यक्रम झाला.संपतराव गायकवाड यांचे चालू व जुन्या शैक्षणिक घडामोडी व लहान प्रसंगातून महान विचारांची पेरणी कशी करायची याविषयावरील व्याख्यानांने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.यावेळी प्राचार्य शिंगे म्हणाले की,माजी विद्यार्थी मेळावा घेण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून पासून नियोजन करण्याचे काम हाती घेतले होते. १९६८ पासूनच्या प्रत्येक माजी विद्यार्थ्यापर्यंत पोहचायचे असा निश्चय मनाशी बाळगून प्रयत्न केला त्यामुळे मेळावा घेण्यात यश मिळाले. याचे मला समाधान वाटते. आयोजनासाठी उत्तम पांढरे,सुजाता पाटील (चौगुले) . विक्रम पाटील, विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली , कुंदन जमदाडे, नितेंद्र जाधव,विजयकुमार पाटील,दिलीप वाघमारे सिद्धेश्वर कोरे व माजी विद्यार्थीनी ,सुमन वांगीकर, अनघा कोटीभास्कर, मोटट्कट्टे सुर्यकांत,आ.जी. टोणे, र्अचना अनुगडे , विकास माने,अनसर शेख, विनायक शिंदे,बाळू गायकवाड,प्रमोद काकडे,प्रदीप मालगावे,संभाजी कोडग लखन होनमोरे,शशिकांत भजबळे, दयानंद मोरे दिलीप वाघमारे, सचिन चौगुले,शंकर आंबी, शिवाजी मोतुगडे,चंद्र शेखर कांबळे नागभूषण वाघमारे ,विशाल खाडे,आदीनी सहकार्य केले. प्रास्तविक मोहन व्हनखंडे यांनी केले.सुञसंचलन विजयकुमार पाटील,कुंदन जमदाडे तर  आभार काकासो कदम व सिध्देश्वर कोरे यांनी मानले.