…तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? – राज ठाकरे

0
19

पुणे(विशेष प्रतिनिधी)दि.18 –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढ्यातील सभेत कहर केला, त्यांनी स्वतःची जात काढून दाखवली. ते म्हणाले मी खालच्या जातीतला आहे म्हणून माझ्यावर आरोप होत आहेत.मग गेल्या ५ वर्षात दलितांना मारहाण झाली तेव्हा तुम्ही गप्प का होता. मोदींच्या गुजरातमध्ये, उनामध्ये दलित बांधवाना मारहाण झाली तेव्हा ते गप्प का होते? महिलांवर अन्याय व्हायचे तेव्हा गप्प का असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी पुण्यातील जाहीर सभेत केला.  मी महाराष्ट्रात भाषण करतोय आणि माझ्या भाषणाच्या क्लीप देशभरात व्हायरल होतेय. देशाला मराठी भाषा समजतेय. हेच चांगले झाले. अनेक जण सांगतात मी देशात भाषणं करावं. हिदींतून भाषण करावं अशी मागणी होतेय. मात्र मी महाराष्ट्रातच राहणार, देशात जाणार नाही असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले.

दलितांवर होणाऱ्या अन्यायावर भाष्य करत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. उनामध्ये गाय मारली नव्हती तर, गाय गेल्यावर त्यांची कातडी काढायला ज्यांना बोलावले, त्यांना गोरक्षकांनी मारहाण केली. पण गो-हत्येवर मोदींची जर अशी तीव्र भूमिका असेल तर मग अनेक जैन मित्र बीफ एक्स्पोर्टमध्ये आहेत असे नरेंद्र मोदी सांगत होतात ना? मग नेमकी तुमची भूमिका काय? असा आरोप राज ठाकरेंनी केला.  दरम्यान ५ वर्षांपूर्वी तुम्हाला नरेंद्र मोदींनी अनेक स्वप्न दाखवली, पण आज ५ वर्षानंतर निवडणुकांच्या तोंडावर मोदी त्या स्वप्नांनवर बोलायला तयार नाहीत. त्यांना निवडणुकीचा प्रचार दुसरीकडे न्यायाचा नाही. त्यांना शहीद जवानांच्या जीवावर मते मागायची आहेत अशी टीका केली.महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करताना म्हणाले की, नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर महिलांवरील बलात्काराचे राजकारण करू नका, असे म्हणताहेत. मात्र विरोधात असताना हेच नरेंद्र मोदीं महिलांवरील अत्याचारांसाठी सरकारला दोषी ठरवत होते.” असा आरोप  राज ठाकरे यांनी केला.