नवा कायदा आला की हफ्ता वाढतो,महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम;

0
46

शिंदे-शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारभारी असलेल्या गृहखात्यावरच केला गंभीर आरोप

बुलढाणा :–आपल्या विधानांनी कायम चर्चेत असणारे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी महायुती सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. राज्यातील पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे करत अप्रत्यक्षपणे आमदार गायकवाड यांनी गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केले आहे. नवा कायदा आला की हफ्ता वाढतो असं वादग्रस्त विधानही आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.

बुलढाणा येथे पत्रकार परिषदेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न विचारल्यावर संजय गायकवाड म्हणाले की, नवा कायदा आला की पोलिसांचा हफ्ता वाढतो. महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम आहेत. आपला देश वगळता अन्य ठिकाणी इतके अकार्यक्षम पोलीस सापडत नाहीत. गुटखा बंदी केली की यांचा हफ्ता वाढला, दारूबंदी केली की यांचा हफ्ता वाढला असा आरोप त्यांनी केला.तसेच ‘माझ्या पार्टनरशिप मुलाला धमकीचे पत्र आले. माझी गाडी उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही चौकशी केली नाही.शासनाने कोणताही नवीन कायदा केला की पोलिसांचा हप्ता वाढतो.दारूबंदीच्या नावाखाली पोलीस हप्ते खातात.पकडलेला मुद्देमाल 50 लाखांचा असेल तर पोलीस तो फक्त 50 हजार रुपयांचाच दाखवतात.मुळात महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम या जगात दुसरे कोणीच नाही…’ आमदार संजय गायकवाड यांचा सुटलेला तोल पाहून पत्रकारही अवाक् झाले.

जर पोलिसांनी एक दिवस जरी प्रामाणिक काम केले तर सर्व वाईट गोष्टी संपतील. गुन्हेगारी संपेल. बुलढाण्यात २ पोलिसांची चोरांसोबत पार्टनरशिप होती. चोराला पकडायला गेले की हे पोलीस त्यांना आधीच इन्फॉर्म करायचे असं आमदार गायकवाड यांनी सांगितले.दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी कोरोना काळातही देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केली होती. राज्यासह देशभरात कोरोनानं हाहाकार उडाला आहे. पण विरोधी पक्ष मदत करायचे सोडून राजकारण करत आहे. मला जर कोरोना विषाणू मिळाला तर तो देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबेन असं विधान संजय गायकवाड यांनी केले होते.