सुरक्षाव्यवस्थेचा अभाव दहशतवादी हल्ल्यास कारणीभूत-डॉ.हुलगेश चलवादी

0
6
सीमाभागातील दहशतवादी तळ उध्वस्त करण्याची आवश्यकता 
 
‘पुलवामा ते पहलगाम’ हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी

पुणे,दिनांक २५ एप्रिल २०२५:-देशाचे मुकूट अशी ओळख असलेल्या काश्मीर खोऱ्यातील ‘पहलगाम’ येथे पाक समर्थित दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांचा केलेल्या नरसंहाराने अवघा देश स्तब्ध झालाय. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या दु:खात बसप सहभागी आहे. पंरतू, सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाल्याने दहशतवादी हल्ला झाला. अत्यंत दुर्गमी असलेल्या या पर्यटनस्थळी एवढ्या मोठ्या संख्येत पर्यटक एकाच ठिकाणी एकत्रित आले असतांना सुरक्षा व्यवस्था का नव्हती? असा सवाल बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी शुक्रवारी (ता.२५) उपस्थित केला.हल्ल्यानंतर एका विशिष्ट वर्गाला ‘समाज माध्यमानवरून’ लक्ष करण्यात आले.दोन धर्मांमध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय.हे प्रकार सरकारने तात्काळ थांबवले पाहिजे.हि वेळ एक राहण्याची आहे,असे डॉ.चलवादी यांनी केली.

‘पुलवामा’ प्रमाणेच ‘पहलगाम’ येथील घटनेनंतर देशवासियांमध्ये मोठ्याप्रमाणात असंतोषाची लाट उसळली आहे. सीमाभागातील दहशवादी तळांचा कायमचा बंदोबस्त करण्याची ‘हीच ती वेळ’ आहे, असे प्रतिपादन डॉ.चलवादी यांनी केले. सीमावर्ती भागातून होणारी घुसखोरी आणि दहशतवादी हल्ले कायमचे रोखण्यासाठी पीओके संदर्भात सरकारने योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन देखील डॉ.चलवादी यांनी केले.

पर्यटन काळात काश्मीर खोऱ्यातील दुर्गम भागातही चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी,असे मत बसपाचे आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित या दुदैवी घटनेनंतर राजकीय पक्षांनी आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी केंद्र सरकारने आवश्यक ती सर्व पावले उचलत जनतेचा विश्वास बहाल करावा, असे आवाहन डॉ.चलवादींनी केले. देशात कुठेही अशाप्रकारची घटना घडू नये यासाठी प्रत्येक भारतीयांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

पहलगाम हल्ला हा थेट दहशतवाद्यांकरवी छेडण्यात आलेले पाकिस्तान पुरस्कृत युद्ध आहे. केंद्र सरकारने या हल्ल्यानंतर घेतलेले निर्णय पाकिस्तान सोबतच्या संबंधांचे भविष्य निर्धारित करणारे आहेत.सरकारच्या भूमिका विरोधात पाकिस्तानात आगपाखड होतेय.परंतु, देशवासियांच्या सुरक्षेसह देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या प्रश्नावर कुठल्याही दबावाला सरकारने बळी पडू नये, असे आवाहन डॉ.चलवादी यांनी केले.