मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांचा भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न; आम आदमी पक्षाच्या आंदोलकांना अडवले

0
40

चंद्रपूर- वन अकादमीतील सरकारी निधीतून खरेदी केलेल्या लाखोंच्या उपकरणांची निष्काळजीपणामुळे नासाडी झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर आम आदमी पक्षाने या प्रकरणाची सखोल चौकशी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. मात्र, मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी या प्रकरणाला दडपण्याचा प्रयत्न करत चौकशीस टाळाटाळ केली.

आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कूडे, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, युवा संघटन मंत्री मनीष राऊत यांनी मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांना तक्रार अर्ज दिला. या अर्जात वन अकादमीतील सरकारी कॉटर्समध्ये निष्काळजीपणे टाकून दिलेली लाखोंची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, औषधी किट्स आणि इतर साहित्य यांची *तात्काळ चौकशी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
### *सरकारी निधीतील लाखोंची नवीन उपकरणे वाया*  
वन अकादमीतील एका बंद खोलीत *स्नेक बाईट उपचार किट्स, प्रथमोपचार किट्स, हार्ड डिस्क, माईक्स, कॅटरेज आणि इतर महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे अनेक बॉक्स पडून होते. ही सर्व उत्पादने *नवीन पॅकिंगमधील असूनही त्यावर मोठ्या प्रमाणात उधळी लागल्यामुळे त्यांची नासाडी झाली आहे. सरकारी निधीतून खरेदी केलेली ही लाखोंची उत्पादने अशा स्थितीत सापडणे हे निष्काळजीपणाचे आणि भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण आहे.
 *जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार आणि मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांच्यात वाद*  
मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांनी घटनास्थळी जाण्यास नकार दिल्याने आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार आणि रेड्डी यांच्यात जोरदार वाद झाला. राईकवार यांनी *या भ्रष्टाचाराची जबाबदारी स्वीकारून तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली, मात्र रेड्डी यांनी उडवाउडवीची उत्तरे देत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.
वाद एवढा वाढला की,रेड्डी यांनी पोलिसांना पाचारण करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.पोलिस आल्यावरही आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाम भूमिका घेत *घटनास्थळी पंचनामा करून संपूर्ण चौकशीची मागणी केली.
### *जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी केले गंभीर आरोप*
आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष *मयूर राईकवार यांनी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
#### *अमरावतीतील प्रकरण:*
– मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप झाले होते.याच प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि नंतर त्यांना निलंबितही करण्यात आले होते.अमरावतीतील भाजप नेत्यांनीही रेड्डी यांच्याविरोधात सबळ पुरावे असल्याचे आयपीएस अधिकाऱ्यांसमोर मांडले होते.
### *”चंद्रपूर जिल्ह्यात भ्रष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती करून भ्रष्टाचाराची उधळी लावली” – मयूर राईकवार*
आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष *मयूर राईकवार यांनी आरोप केला आहे की, चंद्रपूर जिल्ह्यात अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती करून प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची उधळी लावली आहे.मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांच्या अमरावतीतील कार्यकाळात झालेल्या गंभीर भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा चंद्रपूरमध्ये नियुक्त करणे हे स्थानिक प्रशासन आणि राजकीय दबावाचा परिणाम आहे*, असा आरोप त्यांनी केला आहे.
### *आम आदमी पक्षाच्या वतीने मागणी:*  
1. *मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांची चौकशी करून निलंबन करावे.
2. *वन अकादमीतील सर्व खरेदीसंबंधी संपूर्ण ऑडिट करून भ्रष्टाचार बाहेर काढावा.
3. *या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.
4. *सरकारी निधीची वाया गेलेली रक्कम जबाबदार अधिकाऱ्यांकडून वसूल करावी.
जर या प्रकरणाची तात्काळ चौकशी आणि कारवाई झाली नाही, तर आम आदमी पक्ष मोठ्या आंदोलनाची हाक देईल आणि भ्रष्टाचाराविरोधात कठोर लढा उभारेल.